विजेच्या प्रश्नाबाबत माजी सभापती अंकुश ढवळे शेतकऱ्यांसह करणार अमरण उपोषण…
जामखेड प्रतिनिधी
शेतकर्‍याच्या शेतीपंपासाठी दररोज ८ तास विद्युत प्रवाह मिळावा म्हणून सातत्याने मागणी करुन देखील विजेचा लपंडाव सुरूच आहे. यासाठी जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती अंकुशराव ढवळे यांनी परिसरातील विजेचा छळ थांबविण्यासाठी शेतकऱ्यांसह अमरण उपोषणाचा इशारा दिला. या बाबत चे निवेदन जामखेड चे तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

गेली दहा वर्षांपासून पिंपरखेड, हाळगाव, आधी, चोंडी, कवडगाव, गिरवली, अरणगाव, पारेवाडी, डोणगाव, भवरवाडी, पाटोदा, खामगाव, धानोरा, बंजारवाडी, सांगवी, हसनाबाद येथील शेतकरी दररोज ८ तास विद्युत प्रवाह मिळावा म्हणून सातत्याने मागणी करीत आहेत, परंतु दररोज सिंगल फेज व शेती पंपाची वीज मिळत नाही.

त्याच बरोबर लाईट नसल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्य देखील अंधारात आहे. शिक्षणासाठी मिळेल त्या गावी प्रवेश घेऊन लांबचा प्रवास करत विद्यार्थी शिक्षण घेतात. परंतू लाईट नसल्याने त्यांचा अभ्यास होत नाही. त्याच बरोबर पंचक्रोशीतील सदरील सर्वच गावांमध्ये वयोवृद्ध व्यक्तींना देखील त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुसकान होत आहे. त्यामुळे सिंगल फेज वीज व शेतीपंपासाठी दररोज ८ तास वीज देण्यात यावी.
मागणी मान्य न झाल्यास पालकमंत्री, खासदार व दोन्ही आमदार, व वरिष्ठ अधिकारी यांचे लक्ष वेधण्यासाठी अंकुशराव ढवळे शेतकऱ्यांसह मौजे हाळगाव ता. जामखेड या ठिकाणी दिनांक १७ सप्टेंबर रोजी अमरण उपोषणास सुरुवात करून आंदोलन करणार असल्याचे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here