जामखेड प्रतिनिधी

आष्टी तालुक्यातील गावकर्‍यांनवर बिबट्याचे हल्ले थांबताना दिसत नाहीत आज पुन्हा आष्टी तालुक्यातील सोलेवाडी येथे शेतीला पाणी घालत आसलेल्या वृध्द शेतकर्‍यावर बिबट्याने हल्ला केला.

आष्टी तालुक्यातील सोलेवाडी येथे ज्वारी ला पाणी देत असणाऱ्या विकास झगडे या वृद्ध शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला .यात त्यांच्या मांडीला,पोटाला आणि पायाला जखमा झाल्या आहेत .त्यांच्यावर आष्टीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी आमदार सुरेश आण्णा धस यांनी तातडीने भेट दिली. घटना घडल्या नंतर गावकर्‍यांनी या परीसरातील शेताला वेढा घातला आहे. मागील दहा पंधरा दिवसापासून आष्टी तालुक्यातील वेगवेगळ्या गावात बिबट्याने दहशत निर्माण केली आहे .बिबट्याने आतापर्यंत तीन जणांचे बळी घेतले असून चार ते पाच जण जखमी झाले आहेत .

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे औरंगाबाद, नाशिक,अमरावती येथून पथके पाचारण केली आहेत .गेल्या दहा दिवसापासून हे लोक बिबट्याचा शोध घेत आहेत .एकीकडे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे बिबट्याने बीड तालुक्यातील काही गावात देखील दहशत निर्माण केली आहे .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here