लग्नामध्ये हुंडा दिला नाही म्हणून सासरच्यांनी छळलं, त्रासाला कंटाळून विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

जामखेड शहरातील धक्कादायक घटना

जामखेड (प्रतिनिधी) गाडी घेण्यासाठी तुझ्या बापाकडुन पाच लाख रुपये घेऊन ये ,तुला घरकाम व्यवस्थित येत नाही तसेच लग्नात हुंडा दिला नाही म्हणून २२ वर्षीय विवाहितेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्यामुळे विवाहित महीलेने गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी पतीसह एकुण पाच जणांविरोधात आत्महत्या प्रवृत्त केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

मयत प्रतिक्षा व आरोपी पती विजय चव्हाण यांचा विवाह मागिल दोन वर्षापूर्वी झाला होता. लग्नानंतर काही दिवस चांगले गेले मात्र त्यानंतर सासर कडील लोकांकडून प्रतिक्षा हीचा पैशांसाठी छळ होऊ लागला. तीला सासरकडील लोक छळ करताना म्हणत होते की की तुला स्वयंपाक व भाजी व्यवस्थित बनवता येत नाही ,तुझ्या माहेरकडील लोकांनी लग्नात हुंडा दिला नाही ,तुझ्या बापाकडुन गाडी घेण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन ये असे म्हणून तीचा शारीरिक व मानसिक छळ करत होते.

आखेर याच छळाला कंटाळून विवाहिता प्रतिक्षा विजय चव्हाण वय २२ वर्षे रा. संताजी नगर ,जामखेड हीने दि १ फेब्रुवारी २०२३ रोजी आपल्या रहात्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मयत प्रतिक्षा हीचे वडील फीर्यादी अंकुश तुकाराम सगळे रा .सगळेवाडी ता,पाटोदा.जिल्हा बीड यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून पती- विजय दिलीप चव्हाण, सासू -सुरेखा दिलीप चव्हाण, सासरे- दिलीप नामदेव चव्हाण, दीर -अजय दिलीप चव्हाण, ननंद -दिपाली निलेश कोल्हे .सर्व रा. संताजी नगर, जामखेड यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत विवाहिता प्रतीक्षा हिचे ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडे व पोलीस नाईक अजय साठे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here