श्रीरामपूर : शहरातील अहमदनगर डिस्ट्रीक्ट सेंट्रल बँकेच्या आवारात, आज दुपारी १२:४५ वाजेच्या सुमारास. अशोक सहकारी बँकेचे अधिकारी, सुरक्षा रक्षकासह कॅश काढण्यासाठी आले होते. दरम्यान सुरक्षा रक्षक, दशरथ कारभारी पुजारी हे, बँके बाहेरील एटीएम समोर बसलेले असतांना. अचानक पणे त्यांच्या जवळील रायफल मधील गोळी सुटल्याने, बॅंकेत कामासाठी आलेल्या. ४२ वर्षीय अजित विजय जोशी या इसमास सुटलेली गोळी लागल्याने दुर्दैवी मुत्यु झाला आहे.

या दुर्घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, डीवायएसपी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखलझाले असून. सदरची दुर्घटना कशी झाली याबाबत त्यांनी कसून चौकशी सुरू केली आहे.

सदरची घटना शहर मध्यवर्ती ठिकाणी झाल्याने, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बघ्यांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. या घटने नंतर पोलिसांनी सुरक्षा रक्षकास विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतले असून. मयत अजित जोशी हे प्रगत शेतकरी असून, ते वार्ड नंबर ७ मधील सार्वमत रोड परिसरातील रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here