अहमदनगर प्रतिनिधी

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील बापु दत्तात्रय अकोलकर (वय २७) आणि संदिप दत्तात्रय अकोलकर (वय २९ ) या दोन सख्ख्या भावांचा करंजी जवळील बोरुडे तलावात बुडुन मृत्यु झाला.

आज दुपारी मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी तलावावर नेले असता बापु दत्तात्रय अकोलकर याचा पाय घसरुन तो तलावातील पाण्यात पडला, त्याला वाचविण्यासाठी गेलेला त्याचा भाऊ संदिप दत्तात्रय अकोलकर याचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. गरीब मेंढपाळ कुटूंबातील दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने करंजी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here