दिलासादायक! जामखेड शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलाव शंभर टक्के भरला
तालुक्यातील बाकी तलावात फक्त ५ ते २० टक्केच पाणीसाठा
जामखेड प्रतिनिधी

घाटमाथ्यावर झालेल्या जोरदार पावसामुळे जामखेड शहराची जीवनदायी असलेला भुतवडा तलाव मध्यरात्री शंभर टक्के भरला असुन सांडवा ओसंडून वाहत आहे. अनेक दिवसांपासून शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता तलाव भरल्याने शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

जामखेड तालुक्यातील फक्त भुतवडा तलावच भरला आहे. बाकी तलावातील पाणीसाठा ५ ते २० टक्केच आहे. घाटमाथ्यावरील जोरदार पावसामुळे भुतवडा तलाव शंभर टक्के भरला आहे अशी माहिती लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता उमेश कंगनकर ,शाखा अभियंता गणेश काळे व आबासाहेब नेटके यांनी दिली. भुतवडा तलाव हा ११९ दशलक्ष घनफूट आहे तर जोडतलावाची पाणी साठवणूक ५६ दशलक्ष घनफूट आहे जोडतलाव भरल्यावर ते पाणी भुतवडा तलावात येते दोन्ही तलाव शंभर टक्के भरल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. आज दि. २४ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू झाला तो रात्रभर सुरू होता त्यामुळे बीड जिल्ह्य़ातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ रामेश्वर धबधब्याच्या वरती असलेला भुरेवाडी तलाव देखील भरला आहे. रामेश्वर धबधबा ओसंडून वाहत आहे. भुरेवाडी तलाव भरून रात्रीतच भुतवडा तलाव १०० टक्के भरला आहे. व मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे खाली असलेल्या जामखेड जवळील रत्नापूर तलावातील पाणीसाठा वाढण्यास मदत होत आहे.
सध्या गेल्या आनेक महीन्यांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने भुतवडा तलाव भरेल की नाही अशी शंका होती. मात्र गेल्या दोन तीन दिवसापासून बीड जिल्ह्य़ातील घाटमाथ्यावर पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे आखेर शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलाव शंभर टक्के भरल्याने सध्या तरी जामखेड करांची पाण्याची चिंता मिटली आहे. तालुक्यातील तलावांची पाण्याची परिस्थिती पाहीली तर मोहरी तलावात सध्या २० टक्के तर खैरी माध्यम प्रकल्पात ५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. सध्याच्या पडत असलेल्या पावसाने तालुक्यातील तलावातील पाणी पातळी वाढत असल्याची माहिती लघुपाटबंधारे विभागाकडून मिळाली आहे.
तलाव भरला पण जामखेड ची पाणीपुरवठा योजना मृगजळच
जामखेड शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलाव भरला आसला तरी वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत जामखेड करांना आठ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. मात्र गेल्या आनेक महीन्यांपासून १७८.९० कोटी रुपयांची मंजुर आसलेली उजनी (दहेगाव) ते जामखेड ची पाणीपुरवठा योजना राजकीय वादामुळे अडकली आहे. त्यामुळे भुतवडा तलाव भरुनही जामखेड करांना आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here