दिलासादायक! जामखेड शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलाव शंभर टक्के भरला
तालुक्यातील बाकी तलावात फक्त ५ ते २० टक्केच पाणीसाठा
जामखेड प्रतिनिधी
घाटमाथ्यावर झालेल्या जोरदार पावसामुळे जामखेड शहराची जीवनदायी असलेला भुतवडा तलाव मध्यरात्री शंभर टक्के भरला असुन सांडवा ओसंडून वाहत आहे. अनेक दिवसांपासून शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता तलाव भरल्याने शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.