जामखेड येथे जामखेड तालुका काँग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न.
जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे वतीने महाराष्ट्रात दिनांक 3 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर रोजी जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गावोगाव काँग्रेस पक्षाचे वतीने पदयात्रेचे आयोजन करुन जनसामान्यांना भेटून मोदी सरकारचे गेल्या नऊ वर्षांतील अपयश मांडण्यात येणार आहे. याच अनुशंगाने नुकतीच जामखेड तालुका कॉंग्रेस पक्षाच्या वतीने जामखेड येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.
केन्द्रातील भाजपा सरकारचे अन्यायकारक धोरण, भ्रष्टाचार, लोकशाहीची गळचेपी आणी सत्तेचा गैरवापर या विरोधात जनमाणंसामधे जागृती करण्याच्या हेतुने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे वतीने दिनांक 3 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर जनसंवाद यात्रेचे आयोजन महाराष्ट्र भर करण्यात आले आहे. गावोगाव काँग्रेस पक्षाचे वतीने पदयात्रेचे आयोजन करुन जनसामान्यांना भेटून मोदी सरकारचे गेल्या नऊ वर्षांतील अपयश मांडण्यात येणार आहे.
या जनसंवाद यात्रेच्या नियोजनासाठी गुरुवार दिनांक ३१ ऑगस्ट रोजी जामखेड तालुका काँग्रेस पक्षाची बैठक तालुका अध्यक्ष श्री शहजी राजेभोसले यांचे अध्यक्षतेखाली व युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव राहुल उगले, महीला काँग्रेस अध्यक्षा ज्योतीताई गोलेकर ,यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
दिनांक 4 सप्टेंबर रोजी अहमदनगर येथील ऐतीहासीक भुईकोट किल्ल्यापासून महाराष्ट्र काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांचे नेतृत्वाखाली, अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे व मान्यवराचे उपस्थितीत या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ होणार आहे. जामखेड तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते अहमदनगर येथील यात्रेत सहभागी होणार आहेत. जामखेड तालुक्यातील ७० गांवामधे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जनसंवाद यात्रेनिमित्त केंद्र सरकारच्या अन्यायकारक धोरणां बाबत जनजागृती करणार आहे.
जामखेड तालुका कॉंग्रेस पक्षाच्या या बैठकीत तीन ठराव मांडले व पास करून ते प्रदेश काँग्रेस ला पाठविण्यात आले. लोकसभेच्या अहमदनगर मतदारसंघाची जागा ही काँग्रेस पक्षालाच मिळाली पाहीजे अशी भावना सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली, या सुचनेस जामखेड महिला तालुकाध्यक्ष ज्योतीताई गोलेकर यांनी अनुमोदन दिले.