उत्तम वक्ते व्हायचे असेल तर दुसर्‍यांचे विचार एका – गिरीश कुलकर्णी

जामखेड (प्रतिनिधी) स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांना मैल्यवान विचार मिळतात. यशस्वी लोकांच्या कर्तृत्व व त्यागाची जोड महत्त्वाची असते , व्यासंग वाढवा कारण वकृत्वाला व्यासंगाची जोड महत्त्वाची असते. वकृत्वाची सुधारणा करायची आसेल तर दुसर्‍याची भाषणे ऐकायला शिकले पाहिजे. उत्तम वक्ते व्हायचे असेल तर सर्वांचे विचार एका तरच तुम्ही एक चांगले वक्ते व्हाल आसे मत स्नेहालय संस्थेचे विश्वस्त गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या जामखेड महाविद्यालय जामखेड आणि ल.ना.होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वा. सैनिक कै. मधुकाका देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटक आदर्श शिक्षक श्री. मनोहर इनामदार (गवसणीकार) (जि.प.प्राथ. शाळा दत्तवाडी, धोंडपारगाव) यांच्या हस्ते करण्यात आले होते तर समारोप स्नेहालय संस्थेचे विश्वस्त गिरीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख, उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, खजिनदार राजेशजी मोरे, संचालक अशोक शिंगवी, शरद देशमुख, एस. एम खान, विठ्ठल रेडे, अरूणराव देशमुख, प्राचार्य एम.एल. डोंगरे, उपप्राचार्य डॉ. सुनिल नरके, प्राचार्य श्रीकांत होशिंग, प्रा. अविनाश फलके, मुख्याध्यापक श्रीधर जगदाळे, उपमुख्याध्यापक रमेश अडसुळ, लक्ष्मीकांत देशमुख, योगेश आब्दुले, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, अविनाश बोधले, अशोक वीर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना गिरीश कुलकर्णी म्हणाले की, त्याग,नैतिकता कर्तुत्व महत्त्वाचे आहे. हे गुण अंगी असतील तर संपूर्ण जग डोक्यावर घेते. दि पिपल्स एज्युकेशन संस्थेचे काम निस्वार्थ भावनेचे आहे म्हणून परिसरात नावलौकिक आहे.

या स्पर्धेत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून एकुण ३२ स्पर्धक सहभागी झाले होते. या मध्ये प्रथम पारितोषिक न्यु आर्ट्स सायन्स कॉलेज अहमदनगर येथील ढमाले अनिकेत प्रल्हाद हीने पटकाविले तर द्वितीय पारितोषिक बिर्ला काँलेज मुंबई येथील पाटील यश रविंद्र, तृतीय पारितोषिक नाशिक येथील बोरस्ते श्रुती अशोक, उत्तेजनार्थ पारितोषिक प्रवरा मेडिकल ट्रस्ट शेवगाव येथील पायधन रामेश्वर सावळेराम व
ल. ना. होशिंग कनिष्ठ महाविद्यालयची सुरवसे निकिता सुग्रीव यांनी पटकावले आहे .

प्रा. नामदेव म्हस्के यांनी निकाल वाचन केले. राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी परिक्षक कोल्हे सर, तनपुरे सर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल देडे, प्रा. तुकाराम घोगरदरे यांनी तर आभार अविनाश फलके यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here