जामखेड प्रतिनिधी

ओ.बी.सी ना आरक्षण मिळाल्याबद्दल अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या लढ्याला यश मिळाले आहे. या आरक्षणामुळे राजकीय सत्तेमधला वाटा मिळाला आहे आसे मत अॅड अरुण जाधव यांनी व्यक्त केले व शहरातील खर्डा चौक या ठिकाणी पेढे वाटून फटाके वाजून व ढोलीबाजाच्या गजरात आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

जामखेड येथील खर्डा चौकामध्ये दि २२ जुलै रोजी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. यावेळी अॅड. डॉ. अरुण जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. व ते म्हणाले की ओ.बी.सी समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला. व त्यांचे नातू आदरणीय ॲड.बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी जनता दलाचे सरकार असताना. व्ही पी सिंगाचे सरकार ज्यावेळेस होते. त्यावेळेस त्यांनी सांगितले. की मला मंत्रीपदापेक्षा मंडल आयोग लागू करा. ही सगळ्यात महत्वाची मागणी केली होती. इथल्या ओ.बी.सी समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. या महाराष्ट्रातल्या तेली, माळी, साळी, कोळी, सुतार, न्हावी, धनगर, भटका व जेवढ्या ओ.बी.सी जाती आहेत. त्यांना मंडळ आयोग लागू करा. व्ही. पी. सिंगाचे सरकार खाली गेले. तरी त्यांनी माघार घेतली नाही. खरंतर कोर्टाने ओबीसी समाजाला आरक्षण लागू करण्याचा निकाल दिला आहे. तो निकाल सर्वात महत्वाचा आहे. गेल्या दोन महिन्यापूर्वी आदरणीय ॲड. बाळासाहेब आंबेडकर साहेबांना ओ.बी.सी समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. या साठी त्यांना अटक झाली. त्यावेळेस मी स्वतः अटक होतो. त्यावेळेस आम्ही मुंबईला होतो. त्या अटकेचा फायदा आपल्या ओ.बी.सी समाजाला झालेला आहे.

खरंतर इथले सर्व राजकीय पक्ष आहेत. हे सर्व राजकीय पक्ष ओबीसीच्या जीवावर आहेत. परंतु भूमिका मांडायची वेळ आल्यावर हे पक्ष बाजूला जातात. त्याच्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये तमाम इथल्या ओ.बी.सीं नी, भटक्यांनी, दलितांनी, मुस्लिमांनी, एकत्र येऊन उद्याच्या काळामध्ये सत्ता ताब्यात घेतली पाहिजे. असे ॲड .डॉ. अरुण जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.

यानंतर विकी भाऊ सदाफुले म्हणाले. की ओ.बी.सी समाजाला आरक्षण मिळाले. या आरक्षणासाठी जो लढा महाराष्ट्रामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी उभारला व या लढ्याला यश आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ओ.बी.सी आरक्षणासाठी मंत्रिपदाला लाथ मारली. व त्यांचेच वंशज आदरणीय ॲड. बाळासाहेब आंबेडकरांनी ओ.बी.सी ला आरक्षण मिळावे. म्हणून अतोनात प्रयत्न केले. असे मत व्यक्त केले. यानंतर अजहर काजी, प्रा कैलास माने सर, लोक अधिकार आंदोलन नाचे प्रवक्ते बापूसाहेब ओहोळ, जमीर सय्यद यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी उपस्थित मा. सरपंच सुरेश जाधव, सुनील शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे जि. उपाध्यक्ष योगेश सदाफुले, ता. अध्यक्ष अतीश पारवे, रवी सोनवणे, अंकुश पवार, सावता बोराटे, विशाल पवार, सचिन भिंगारदिवे, भटके विमुक्ताचे नेते भीमराव सुरवसे, विशाल जाधव, अजिनाथ शिंदे, लाला वाळके, रावसाहेब खोत, उबेद शेख, अमरनाथ डोंगरे, जितेंद्र जाधव, विष्णू म्हेत्रे, संतोष शेगर, वैजनाथ केसकर सर, राजू शिंदे, होलार समाजाचे नेते सुरज बिरलिंगे, दशरथ निमोनकर, भाऊसाहेब रासकर, महादेव गिरमे, संतोष चव्हाण, अक्षय समुद्र, बाबा सोनवणे, ओम आखाडे, दिनेश ओहोळ, नवनाथ आव्हाड, सुदाम शेगर आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here