जामखेड प्रतिनिधी

आष्टी तालुक्यातील सुरुडी, किन्ही व पारगाव याठिकाणी मानवी हल्ले केलेल्या बिबट्याला शोधून जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या एकूण सतरा टीम स्थापन झाल्यात. त्यामध्ये औ.बाद, अमरावती, नांदेड व इतर 1 अशा एकूण चार वन्यजीव व्यवस्थापनामध्ये तज्ञ टीमचा समावेश असून एकूण ८० कर्मचारी सक्रीय आहेत. तसेच आजूबाजूच्या गावामध्ये या टीमद्वारे पेट्रोलिंग करून बिबट्याचा मागोवा घेण्याचे व सुरक्षितता बाळगण्यासाठी प्रबोधन करण्याचे काम सुरू आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सहा पिंजरे
लावले आहेत. उद्या आणखी दोन पिंजरे लावण्यात येणार आहेत. बिबट्यास लवकरच यशस्वीपणे जेरबंद करू असा विश्वास वनविभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here