जामखेड प्रतिनिधी

पहील्या लाटेपेक्षा दुसर्‍या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या ही चार पटीने वाढली आहे. त्यामुळे हीच संख्या तिसऱ्या लाटेत अधिक होणार आहे. जिल्ह्य़ात तीसरी लाट थोपवायची आसेल तर सर्वांनी काळजी घ्यावी. कर्जत आणि जामखेड तालुक्याच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे असे मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.

राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा १४ आॅगस्ट रोजी जामखेड तालुका दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्याची सुरुवात खर्डा येथील वखार महामंडळाच्या गोडाऊनच्या भुमीपुजनाने झाली. यानंतर दुपारी जामखेड येथील आरोळे हाॅस्पिटल येथे कॅथॉलिक लॅबचे उद्घाटन करण्यात आले. तसेच ग्रामीण रुग्णालय येथे आॅक्सीजन प्लॅन्ट व आॅक्सिजन बेड लोकार्पण सोहळा व शेवटी कर्जत जामखेड मधिल कोरोना रुग्णांच्या परीस्थिती बाबत जामखेड येथे कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . या वेळी आ.रोहित पवार, जिल्हा अधिकारी राजेंद्र भोसले, मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षिरसागर, पोलीस अधिक्षक मनोज पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ रामटेके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सोनाली बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, प्रभारी तहसीलदार नवनाथ लांडगे, मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ युवराज बोराडे, वैद्यकीय अधिक्षक डाॅ संजय वाघ, राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, सभापती राजश्री सुर्यकांत मोरे, कर्जत चे कॉंग्रेस तालुका अध्यक्ष बाळासाहेब साळुंके, राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे, कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा मधुकर राळेभात, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष शहाजीराजे भोसले, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले, सुर्यकांत मोरे, उपस्थितीत होते.

या नंतर आमदार रोहित पवार म्हणाले की कोरोना काळात कर्जत जामखेड साठी सर्व प्रथम आरोग्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. अत्तापर्यंन्त बारा हजार रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले असुन ते बरे झाले आहेत. दोन्ही तालुक्यात अतिरिक्त ९ रुग्णवाहिका देण्यात आल्या असून जामखेड येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले आहे. केंद्र सरकारकडून लसीचा पुरवठा मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे असेही ते म्हणाले.

या नंतर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी माहीती देताना सांगितले की तिसरी लाट सुरू झाली आहे मागिल महीन्यात जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या त्या मुळे पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला आहे. सध्या रूण बरे होण्याचे प्रमाण ९७% आहे. उद्या पासून जिल्ह्यातील निर्बध शिथील झाले आसले तरी पुढील दोन महीने सर्वांनी आसली काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या दरम्यान कोविड रुग्णांची मोफत सेवा केली त्यामुळे आरोळे हॉस्पिटल चे संचालक डॉ रवी आरोळे व त्यांच्या भगीनी शोभाताई आरोळे यांना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here