जामखेड प्रतिनिधी

पाण्याच्या प्लॅन्टसाठी नवीन सामान आनण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये घेऊन ये या कारणासाठी होत आसलेल्या छळास कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पती व सासु सासर्‍यांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला हुंडाबळी चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती मौज्जम अल्ताफ शेख, सासरे अल्ताफ हुसेन शेख व सासु शहीन अल्ताफ शेख रा. द्रोणागीरी कॉलनी, जामखेड अशा तीन जणांविरोधात हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की मयत मुलीचे वडील फीर्यादी शब्बीर इस्माईल पठाण, रा कानडी ता. आष्टी यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की माझी मुलगी मयत अमरीन शेख हीचे दिड वर्षापुर्वी लग्न झाले होते. मात्र सासरकडील लोक तिला आपल्या माहेरुन पिण्याच्या पाण्याचा प्लॅंन्ट चे नवीन साधन सामुग्री आणण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये घेऊन ये असे म्हणून तीला वेळोवेळी त्रास देऊन शिविगाळ व मारहाण करत होते. तसेच दोन लाख रुपये आणले नाहीत तर तु सासरी रहायचे नाही तु तुझ्या माहेरी निघून जा असे म्हणुन वेळोवेळी छळ केला जात होता. याच त्रासाला कंटाळून मयत अमरीन मोज्जम शेख वय २६ रा. द्रोणागीरी कॉलनी जामखेड हीने सासरच्या छळास कंटाळून आपल्या सासरकडील द्रोणागीरी कॉलनी येथे दि १२ जुलै रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजु थोरात हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here