

विजयादशमी उत्सवानिमित्त पथसंचलन व शस्त्रपूजन जामखेड येथे संपन्न, सेवा, सुरक्षा व संघटन याचे एकत्रित दर्शन.
जामखेड प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या शताब्दी वर्षात पदार्पण करत आहे राष्ट्रकार्याची अविरत ज्योत तेवत संघ काम करत आहे असंख्य स्वयंसेवक आपले संपूर्ण जीवन या कार्यासाठी वाहून देत आहेत आणि याचाच प्रत्यय एखादी संघटना शताब्दी वर्षात तेव्हड्याच मोठ्या ताकदीने पदार्पण करत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जामखेड येथे हा उत्सव साजरा करण्यात आला.

या उत्सवात २७० स्वयंसेवक हे पूर्ण गणवेशात पाथसंचालनासाठी सहभागी झाले होते. बाजार समिती ते महावीर भवन पर्यंत हे संचलनाचे स्वागत पुष्पवर्षाव व रस्त्याच्या दूतर्भ रांगोळी काढून नागरिकांकडून करण्यात आले. महावीर भवन येथे शस्त्र पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . जामखेड तालुका कार्यवाह मा.श्री.बाळासाहेब दळवी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे श्रीमती. सीमाताई कुंदन गायकवाड (स्वच्छता दूत) या नगरपरिषद येथे २० वर्षापासून स्वच्छता विभागत काम करून आपल्याला सेवा देत आहेत तसेच कॅप्टन श्री.लक्ष्मण भोरे यांनी आपले जीवन देशसेवेत घालवले आहे यांचे स्वागत केले.

रा.स्व. संघ या संघटनेने आपले १०० वर्ष संघटन उभारून राष्ट्र प्रथम या भावनेने काम करत आहे, म्हणजेच सेवा,सुरक्षा व संघटन याचा त्रिवेणी संगम या व्यासपीठावर पाहायला मिळाला असे प्रतिपादन प्रमुख वक्ते मा.श्री. यशोवर्धन(आण्णा) वाळिंबे यांनी केले. स्वदेशी, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन व पर्यावरण या पंचपरिवर्तनाचे प्रमुख बिंदू समोर ठेवून पुढच्या काळात संघ स्वयंसेवक घरोघरी प्रबोधन करतील व यातूनच राष्ट्रनिर्मिती साठी मोठे काम उभे राहील. नागरिकांची जास्तीत जास्त स्वदेशी उत्पादने खरेदी करावीत यामुळे आपली अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होईल.

आज देश अशांत करण्याचे प्रयोग हे परकीय शक्ती इथल्या काही लोकांना हाताशी धरून करत आहेत देशात जात,प्रांत, भाषा आणि वेगवेगळी आंदोलनं उभी करून लोकांना भ्रमित करण्याचे काम काही अदृश्य शक्ती करत आहेत त्यामुळे आपण या शक्ती वेळीच ओळखून यांचा डाव हाणून पडला पाहिजे. देश एक व संघटित रहावा म्हणूनच डॉ. हेडगेवार यांनी संघाची स्थापना आपले काही निवडक सहकारी घेऊन १०० वर्षापूर्वी नागपूर येथील त्यांच्या घरी केली आणि त्या लहान रोपट्याचा आज वटवृक्ष झाल आहे. डॉ.हेडगेवार यांनी दिलेला संघटनेचा मंत्र जपत हिंदू समाजाचे संघटन व त्यातून राष्ट्रप्रथम ही भावना ठेऊन संघ अविरत काम करत आहे असे प्रमुख वक्त्यांनी सांगितले.








