

दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी मारुन आत्महत्या; जामखेड तालुक्यातील धक्कादायक घटना
जामखेड प्रतिनिधी
रक्षाबंधनाच्या पुर्वसंध्याला जामखेड तालुक्यातील नायगाव येथे काल शुक्रवार रोजी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. रूपाली नाना उगले (वय २५) या तरुण आईने आपल्या दोन मुलांसह घराजवळील विहिरीत उडी घेऊन जीवन संपवले. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी सध्या पोलीसांन कडुन तपास सुरू आहे.

आत्महत्या केलेल्यांमध्ये रूपाली उगले यांच्यासोबत मुलगा समर्थ उगले (वय ५) आणि मुलगी चिऊ उगले (वय ३) यांचा समावेश आहे. पती नाना उगले, पत्नी रूपाली, मुलगा समर्थ आणि मुलगी चिऊ असे चार जण घरात राहत होते. मुलगा शाळेतून आल्यावर सायंकाळी रूपालीने गणवेशातच मुलाला व लहान मुलीस विहिरीवर नेले आणि रुपाली हीने एकत्रितपणे पणे आपल्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. यानंतर पती व सासरे शेतातुन घरी आले तेंव्हा त्यांना पत्नी व दोन्ही मुले घरी दिसुन आले नाहीत यावेळी त्यांनी आजुबाजुला शोध घेतला असता शेजारील विहिरीच्या वर चपला दिसुन आल्या यानंतर सदरची घटना लक्षात आली. यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत बोरीच्या काटाड्या टाकुन रात्री उशिरा तीनही मृतदेह बाहेर काढले.

घटनेची माहिती मिळताच खर्डा पोलीस स्टेशनचे सापोनि उज्वल राजपुत आपल्या पोलीस पथकासह
तातडीने घटनास्थळी पोहोचले. यानंतर मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ आणि माहेर कडील नातेवाईक दाखल झाले होते. मृतदेहांना विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून, खर्डा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
नेमकं प्रकरण काय असा सवाल नागरिकांमधून उपस्थित झाला असून चर्चेला उधाण आले आहे. याबाबत खर्डा पोलीस तपास करीत आहेत.





