जामखेड येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारे रेशनचे धान्य पकडले, चार जणांनवर गुन्हा दाखल
जामखेड प्रतिनिधी
गरिबांच्या हक्काचे रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्री साठी घेऊन जात असतानाची गुप्त माहिती
जामखेडची तहसीलदार गणेश माळी यांना मिळाली. यानंतर तहसीलदार यांनी नगररोडवर या पिकअप वहाणास रंगेहात पकडले. तसेच वहान चालकाकडून 55 हजार 900 रुपयांच्या 43 धान्याच्या गोण्या व एक पांढऱ्या रंगाची पिकप असा एकूण 2लाख 55 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पिकप चालकासह एकूण चार जणांना विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश पोपट बांगर रा. मोहा, विष्णु टकले, आशोक टकले (पुर्ण नाव माहीत नाही) दोघे रा. बटेवाडी व वहान चालक लखन सतिश क्षीरसागर रा. साकत फटा आशा एकुण चार आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की दि 24 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास वहान चालक लखन सतिश क्षिरसागर रा. साकत फटा हा पांढर्या रंगाचे पिकअप क्रमांक एम एच 12 एम.व्ही 7243 या वाहनाने चालला होता. मात्र या वाहनात काळ्या बाजारात धान्य विक्रीसाठी घेऊन जात असल्याची गुप्त माहिती जामखेड चे तहसीलदार गणेश माळी यांना समजली. त्यामुळे त्यांनी तातडीने आपल्या पथकासह या वाहनाचा पाठलाग केला. सदरचे वहान नगररोड कडुन शासकीय विश्रामगृहाच्या समोरून विंचरणा नदीच्या जुन्या पुलावरून जांबवाडीरोडकडे जात असताना माहित झाले.
पिकअप वहान हे जांबवाडी रस्त्यावरील स्मशानभूमी जवळ आले असतानाच या वाहनास पकडले. या वहानाची तहसीलदार गणेश माळी यांनी तपासणी केली असता या वाहनात अत्यावश्यक वितरण व्यवस्थेचा तांदुळाचे 43 कट्टे मिळुन आले. या गोण्यांनवर गव्हमेंन्ट ऑफ पंजाब असे नाव लिहिले होते. यानंतर सदरचे वहान व धान्य पकडुन जामखेड पोलीस स्टेशनला आणण्यात आले. या प्रकरणी शासकीय धान्य गोदामाचे गोदामपाल बाळु गोविंद भोगे यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून वरील चार आरोपींन विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस करत आहेत.
चौकट
काळ्या बाजारात विक्रीसाठी गेलेले धान्य हेच पुन्हा शहरातील धान्याच्या दुकानात विक्री करण्यात येते. काळ्या बाजारात विक्री करणारे आरोप व काही ठराविक धान्याचे दुकानदार यांच्या संगनमताने हा गोरख धंदा चालतो. हेच धान्याचे दुकानदार हे रेशनचे धान्य चढ्या भावाने विक्री करुन या गोरगरीब ग्राहकांची लुट करतात. याबाबत सदर पकडलेले धान्य कोठून आले व ते कोणास विकणार होते याबाबत काय चौकशी होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.