कर्जत जामखेड मतदारसंघातील सर्वसामान्य जनता रोहित (दादा) पवार यांच्या बरोबर- सरपंच सागर (भाऊ) कोल्हे
जामखेड येथे नुकत्याच झालेल्या स्वाभिमानी कार्यकर्ता मेळाव्या मध्ये राजुरीचे लोकनियुक्त सरपंच सागर भाऊ कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, हे आपल्या मतदारसंघात जे काही विकास काम झाली आहेत ती रोहित दादांनी सत्तेच्या फक्त अडीच वर्षात केली आहेत, या विकासकामामुळे मतदारसंघातील सर्वसामान्य जनता रोहित दादा पवार यांच्या बरोबरच आहे, तसेच राम शिंदे साहेबांनी फक्त दादांनी मंजूर करून आणलेली विकास काम अडविण्याचे काम केले, त्यातच आपल्या मतदारसंघात MIDC झाली असती तर युवकांच्या हाताला रोजगार मिळाला असता, हे काम अडविण्याचे पाप सुद्धा राम शिंदे नी केले आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनता ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून देईल या बद्दल कोणाच्याही मनात तिळमात्र शंका नाही.
चौकट
येणारी निवडणूक ही आपल्या मतदारसंघाचे भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे, मतदारसंघाचा खराखुरा चेहरा मोहरा बदलण्याचे काम रोहित (दादा) पवार यांनी केले, त्यामुळे राम शिंदे साहेब इथून पुढे कधीच जनतेतून निवडून येऊ शकत नाहीत आसे मत देखील काकासाहेब कोल्हे, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोशल मीडिया जामखेड तालुका यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here