बिबट्याच्या हल्ल्यात साडेतीन वर्षीय मुलाचा मृत्यू; गावावर शोककळा

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील चितळी येथे अंगणात खेळत असलेल्या साडेतीन वर्ष वयाच्या प्रथमेश मयूर वाघ या चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला करून घरापासून सहाशे फूट अंतरावर फरफटत नेल्याने मुलाचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेने चितळी गावावर शोककळा पसरली आहे. वनविभागाचा हलगर्जीपणा या बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप करत ग्रामस्थांकडून वनविभागाविषयी संताप व्यक्त होत आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील चितळी (ता.राहाता) येथील मयूर दत्तात्रय वाघ यांची वस्ती गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाकडी रोड काकडाई मंदिराजवळ आहे. काल दि 18 रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अंगणात खेळत असलेला प्रथमेशवर घराशेजारी असलेला डाळींबाच्या बागेतून दबा धरून बसलेल्या बिबट्याने झेप घेत क्षणार्धात धूम ठोकली.

बाहेर असलेल्या आजीने आरडा ओरडा केल्यानंतर घरातील सर्व बिबट्याच्या दिशेने धावले. मात्र, बिबट्या मिळून न आल्याने त्यांनी डाळींब, मका पिकात व इतर शोध घेतल्यानंतर घरापासून सहाशे फूट असलेली गिन्नी गवतात रक्तबंबाळ अवस्थेत चिमुरडा आढळला. त्यांच्या मानेला मोठ्या प्रमाणात जखमा होऊन तो जागेवरच गतप्राण झाला होता.

त्याला तातडीने पुढील उपचारासाठी श्रीरामपूर येथील कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. रात्री उशिरा ग्रामीण रुग्णालयात शेव विच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरापर्यंत वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी आलेले नव्हते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here